चाैकीदार नव्हे तर जनता चोर; त्यामुळेच असे चोर निवडून जातात.. अनिल घनवट

ही निवडणूक कृषी धोरणांवर आधारित निवडणूक असायला हवी होती. त्यामुळे 2019 च्या लोकसभेसाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात 40 उमेदवार उभे करण्यात येणार असून या 40 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज अकोल्यात केली.
चाैकीदार नव्हे तर जनता चोर; त्यामुळेच असे चोर निवडून जातात.. अनिल घनवट

अकोला : ही निवडणूक कृषी धोरणांवर आधारित निवडणूक असायला हवी होती. त्यामुळे 2019 च्या लोकसभेसाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात 40 उमेदवार उभे करण्यात येणार असून या 40 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज अकोल्यात केली.

ते म्हणाले, "कालपर्यंत टीका करणाऱ्या पक्षाचे नेतृत्व मान्य करणारे आजज अनेक नेते आहेत. धोरणं, तत्वज्ञान काही  आहे की नाही, असा प्रश्न पडावा. केवळ पैसा कमवण्यासाठी सत्तेत जाण्यासाठी  कुटुंबाची बैठक होते. कोणी कुठे उभे राहायचे हे ठरते. या स्थितीपर्यंत राजकारण ढासळणे, ही गंभीर बाब आहे. ही पाच वर्षे तरी का वाया घालवायची, याचा  याचा आपण विचार करणे आवश्यक आहे.  तरुणांनी तर विचार करावा की, त्यांना काय भवितव्य आहे. पैसे कमावण्यासाठी कोणी सतेत्त जात असल्यास आपण नेमकं मतदान कशासाठी व कोणाला करायचे?"  

तुम्हीच तुमचे नेते-राज्यकर्ते तयार करता; खरं तर चौकीदार नव्हे तर जनता चोर असून,  त्यामुळेच असे चोर निवडून जातात, असेच म्हणावे लागेल, असे वक्तव्यही अनिल घनवट यांनी  केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com