भारतापासून आसाम स्वतंत्र करा म्हणणाऱ्या शरजील इमामला अटक 

भारतापासून आसाम स्वतंत्र करा म्हणणाऱ्या शरजील इमामला अटक 

नवी दिल्ली : भारतापासून आसाम स्वतंत्र करा सांगत देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमामला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. 

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा तो माजी विद्यार्थी होता. त्याने चिथावणीखोर भाषण केल्याचा शरजीलवर आरोप असून त्याच्यावर देशद्रोहाचा आरोपही आहे. 
दिल्ली पोलिसांनी जहानाबाद या ठिकाणी जाऊन त्याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. 

शरजील इमामचा शोध गेल्या दोन दिवसांपासून सुरु होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथकंही तयार केली होती. एवढंच नाही तर मुंबई, पाटणा आणि दिल्लीत काही ठिकाणी छापेही मारण्यात आले होते.

जेएनयूचे मुख्य प्रॉक्‍टर धनंजय सिंह यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजीलला फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते. शरजीलने चिथावणी देणारं भाषण करुन विद्यापीठातील वातावरण कलुषित केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंबंधीचा अहवाल जेएनयूच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com