अजित पवारांचे वक्तव्य खोडसाळ आणि दिशाभूल करणारे :  शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने हा निर्णय घेतला आहे ,की शिवसेना आणि काँग्रेस पक्षाबरोबर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचे आहे . -शरद पवार
sharad-pawar
sharad-pawar

 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर देऊन या ट्विटमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकला आहे. 

शरद पवार आपल्या ट्विटमध्ये  असे म्हणतात की,  भाजपबरोबर महाराष्ट्रात आघाडी स्थापन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने हा निर्णय घेतला आहे ,की शिवसेना आणि काँग्रेस पक्षाबरोबर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करायचे  आहे . 

 अजित पवार यांचं विधान खोटे ,  दिशाभूल करणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. अजित पवार यांचं वक्तव्य हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमज पसरवणारे  आहे, असेही शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच आहे आणि सदैव राहीन. तसेच शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत असे ट्‌विट अजित पवार यांनी आज केले होते . 

अजित पवार यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये असे म्हंटले होते की , भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांची आघाडी पुढची पाच वर्षे महाराष्ट्रात स्थिर सरकार देईल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणाने काम करेन. 


त्याला प्रत्युत्तर देताना श्री. शरद पवार यांनी भाजप बरोबर जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे स्पष्ट करून अजित पवारांना एक्सपोज केले आहे असे मानले जाते . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com