मावळ मतदारसंघ आम्हाला अनुकूल नव्हताच : शरद पवार 

..
sharad-Pawar
sharad-Pawar

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात शक्‍य तितके प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी केले. मात्र, तो मतदारसंघ आमचा नव्हता. त्यामुळे नवा उमेदवार देऊन एक प्रयत्न आम्ही केला, अशी भूमिका राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली. राज्यात आम्हाला बारा जागांची अपेक्षा होती. मात्र, आम्ही आठ जागांपर्यंत निश्‍चित पोचू, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मावळमधून पार्थ पवार यांच्या पराभवाची घोषणा झाल्यानंतर राज्यातील तसेच देशातील निकालासंदर्भात पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. आता निकाल जाहीर होत आहेत. त्यामुळे ईव्हीएम बद्दल बोलणे योग्य नाही. मात्र, निवडणुकीच्या काळात ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात संशय होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा कितपत परिणाम झाला या बद्दल आताच सांगाता येणार नाही. त्यावर अभ्यास करून बोलता येईल, असे सांगितले.

राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार नसल्याने त्यांचा सभांचा फारसा परिणाम झाला नसावा. मात्र, त्यांनी योग्य माहिती मतदारांपयंत पोचविण्याचा प्रयत्न केला, असे पवार यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनीही मनापासून काम केले. त्यामुळे या निकालामुळे कार्यकर्ते नाराज न होता अधिक जोमाने कामाला लागतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com