मुंबई : ''धनंजय मुंडे यांनी सभेत पंकजा मुंडे यांचा बहिणाबाई म्हणून उल्लेख केला. मी संपूर्ण पाहिलं नाही, पण जेवढे पाहिले त्यात ते बहिणाबाई बोलले, त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही. मीही माझ्या बहिणीला कधी कधी प्रेमाने बहिणाबाई म्हणतो. मराठी साहित्यात बहिणाबाई यांचा फार आदर आहे. बहिणाबाईंची साहित्यकृती घराघरात गेलेली आहे. बहिणाबाई म्हणून जर उल्लेख केला असेल, तर यात वाईट समजण्याचे काही कारण नाही,'' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. निवडणूक होऊन जाईल आणि हे प्रश्न संपतील, असेही साम टिव्हीशी बोलताना पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले, "साताऱ्यासह इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा परिवर्तनाची चाहूल दिसत. ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये चिड असल्याचं पाहायला मिळालं. सभेत जर मुख्यमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देण्याऐवजी त्याला बाहेर काढले जातं आणि लगेच शिवाजी महाराज की जय वंदे मातरमच्या घोषणा देत मन विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखं काही नाही, म्हणूनच त्यांचा पराभव त्यांना दिसतोय,''
ते पुढे म्हणाले, "रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगला अभ्यास केलेला आहे विकास कसा करायचा याचाही अभ्यास केलेला आहे त्यांची पहिली निवडणूक आहे त्यामुळे त्यांना यश मिळेल अशी खात्री आहे. 24 तारखेला मला परिवर्तन दिसतय. लोक परिवर्तनासाठी आतुर आहेत, असे मला वाटते"
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.