जे गेले त्यांची चिंता करत नाही!

देशासमोर सर्वात मोठा प्रश्न आर्थिक मंदीचा आहे.
जे गेले त्यांची चिंता करत नाही!

श्रीरामपूर (नगर) : आज आम्ही सत्तेत नाही. मात्र काहींना सत्तेशिवाय रहावत नाही. यातून होणारे पक्षांतर सामान्य मतदारांना पसंत नाही, अशी प्रतिक्रिया येत आहे. संधी मिळाल्यावर मतदारच ते दाखवून देतील, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

येथील रयत संकुलातील विविध उदघाटने व नामकरण सोहळ्यानंतर बोरावके महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, जे गेले त्यांची चिंता नाही. आपल्या राजकीय जीवनात यापुर्वीही असे घडले होते. ६० पैकी ५२ जण सोडून गेले होते. त्यानंतरही कष्टाने सर्व जागा निवडून आणल्या. विकासासाठी आम्ही जात असल्याचे त्यांचे म्हणणे असले, तरी त्यांचा दहा पंधरा वर्षे याच सरकारमधून विकास झाला. आता विकास म्हणजे नेमके काय, हे मला माहिती नाही. गेल्याने कोणी एकाकी पडत नसते.
 
सांगली कोल्हापूरातील महापुराबाबत कोण जबाबदार हे महत्वाचे नाही. पुरामुळे सहा महिने शेतीची कामे होणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यातून त्यांना सावरण्याचे काम प्रथम केले पाहिजे. मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचा आनंद आहे. देशासमोर सर्वात मोठा प्रश्न आर्थिक मंदीचा आहे. अनेक कंपन्यांनी कामगार कपात केल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे बरोबर होते, असे नाही, त्यांची भुमिका आमच्या पक्षाला पोषक होती. त्यांच्या सभेस मोठी गर्दी होती. मात्र पक्षाचा उमेदवार नसल्याने ती मते कोणाला पडली तसेच यावेळी त्याची भुमिका काय आहे माहीती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com