लोकभावनेची कदर नसलेले हे  सरकार उलथवून टाका  : शरद पवार 

sharad_pawar.
sharad_pawar.

मुंबई:  देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतीची लाखो कोटी रूपयांची कर्जमाफी मोदीसरकार देत आहे. मोदी व फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाका,असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले . 


शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला . चेंबूर येथील सभेत अणुशक्तीनगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक व चेंबूर मधून काॅग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना पवार म्हणाले की, पाच वर्षातील भाजपचा कारभार पाहता बदल हवा अशी भावना लोकांनी बनवली आहे. परिवर्तनाची गरज अाहे कारण समाजातला  कोणताही वर्ग  समाधानी नाही .

शेतकरी, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी, व्यापारी सगळे नाखुष आहेत. हाताला काम नसल्याने बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनली आहे. पण या सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 

मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतीचे 70-80 हजार कोटी कर्ज माफ केले. पण शेतकऱयांचे  कर्ज माफ करत नाही. असा टोलाही पवार यांनी लगावला. 

श्री. पवार पुढे म्हणाले, आम्ही राज्याच्या कानाकोपर्यात उद्योग उभे केले पण आज आज पन्नास टक्के उद्योग बंद पडलेत. जे सुरू आहेत ते कसेबसे सुरू आहेत. कामगार उघड्यावर पडला आहे. पण या सरकारला भावनिक मुद्द्यावर निवडणूका लढवायच्या आहेत. हे सरकार लोकांच्या हिताची जपणूक करणारं नाही. म्हणून ते उलथवून टाकायलाच हवं.  असे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com