वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे, तिथे नव्याला  संधी दिली पाहिजे : शरद पवार

संघटनात्मक काम कमी पडले. त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्हे आहेत. तिथे वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे तिथे नव्याने संधी दिली पाहिजे त्यावेळी तो जोमाने काम करेल - शरद पवार.
sharad-Pawar-
sharad-Pawar-

मुंबई :  वंचितला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजुला आहे की नाही हे पाहिले नाही त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. आता आपल्या कामाने हा समाज आपल्याकडे कसा येईल असा प्रयत्न येत्या काळात करू , असे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले . 


 आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

विधानसभेची निवडणूक झाली. निकाल संमिश्र लागला. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे हे लोकांनी लक्षात आणून दिले आहे, असेही शरद पवार म्हणाले.

तुम्हाला यश आले नाही त्याची अनेक कारणे आहेत.दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपुर वापर त्यानी केला . माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो त्यावेळी मी स्वतः चे काम तपासून घ्यायला हवे , असे  शरद पवार यांनी यावेळी सांगितले . 


तरुणांनी पक्षाला चांगला पाठिंबा दिला. मुळात यावेळी अल्पसंख्याक समाजाची शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र काही ठिकाणी आपण मागे पडलो असेही शरद पवार म्हणाले. 


समाजातील जो गरीब वर्ग आहे तो वंचितच्या मागे उभा राहिला. लोकसभेत पाठिशी राहिला.त्यामुळे ती ताकद दिसून आली मात्र जो मुस्लिम समाज वंचितच्या पाठिशी राहिला तो विधानसभेत मुस्लिम समाज बाजुला गेला तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला असे शरद पवार यांनी सांगितले.

काही ठिकाणी पराभव झाला. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्हे आहेत. तिथे वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे तिथे नव्याने संधी दिली पाहिजे त्यावेळी तो जोमाने काम करेल ,असेही शरद पवार म्हणाले.


एससी व एसटी या समाजाच्याठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देतो आहे की नाही हेही पाहिले पाहिजे.


मुंबई, ठाणे याठिकाणी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आता एकच जागा मुंबईत आली आहे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे तुम्ही त्याचा वापर करून घ्या.महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहे हे लक्षात आणुन देऊ असे आवाहन शेवटी शरद पवार यांनी केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com