1980 मध्ये माझे सरकार बरखास्त झाल्यावर अनेक महत्वाचे निर्णय झाले होते - शरद पवार

सन 1980 मध्ये माझे सरकार बरखास्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यावेळीही अनेक महत्वाचे निर्णय झाले होते. हे मला माहिती आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय होऊ शकतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
1980 मध्ये माझे सरकार बरखास्त झाल्यावर अनेक महत्वाचे निर्णय झाले होते - शरद पवार

नागपूर - सन 1980 मध्ये माझे सरकार बरखास्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यावेळीही अनेक महत्वाचे निर्णय झाले होते. हे मला माहिती आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय होऊ शकतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यपाल त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालवतात. अशा स्थितीत केंद्र सरकारचे अधिकार वाढतात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्‌भवलेल्या संकटाच्या स्थितीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेऊन तात्काळ पावले उचलली पाहीजे. यासाठी आपण लवकरच देशाचे कृषिमंत्री आणि इतर महत्वाच्या खात्याच्या मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी आधी बॅंकेत पैसे भरावे लागतात. त्यानंतरच ही प्रक्रीया पार पडते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बॅंकांमध्ये पैसे भरणे आवश्‍यक असल्याचेही पवार यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com