केंद्राने देशाच्या सीमा रक्षणाची जबाबदारी हातात काठ्या घेणाऱ्या आरएसएस स्वयंसेवकांना सोपवावी -शरद पवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा उपरोधिक भाषेत समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच मागणी केली आहे . केंद्र सरकारने देशाच्या सीमा रक्षणाची जबाबदारी खरोखरच आरएसएस स्वयंसेवकांना सोपवावी अशी मागणी त्यांनी ट्विटरवर केली आहे .
Sharad-Pawar-Mohan-Bhagwat
Sharad-Pawar-Mohan-Bhagwat

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा उपरोधिक भाषेत समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच मागणी केली आहे . केंद्र सरकारने  देशाच्या  सीमा रक्षणाची जबाबदारी  खरोखरच आरएसएस स्वयंसेवकांना सोपवावी अशी मागणी त्यांनी ट्विटरवर केली आहे .

देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर सीमेवर जाण्यासाठी सैनिकांना अनेक महिने तयारी करावी लागते. मात्र हेच काम संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसात करतील असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं.

भागवतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना  शरद पवार यांनी असे म्हंटले आहे की  ,"देशासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या सेनेऐवजी सीमेवर तोंड द्यायला #RSS चे स्वयंसेवक जाणार, तेही ३ दिवसांत. केंद्र सरकारने काठ्या घेऊन, हाफ पँट घालून आतंकवाद्यांचा सामना करत सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, म्हणजे भागवतसाहेबांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल."

 मोहन भागवत  यांनी सैनिकांचा अपमान केला अशी टीका होत आहे . देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषविलेल्या शरद पवार यांनी सीमेवर किती प्रतिकूल परिस्थितीत  सैनिक प्राणांची आहुती देऊन लढतात हे या ट्विटद्वारे स्पष्ट करताना मोहन भागवतांना  टोला लगावला आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com