सात बारा कोरा करण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरेंनी पाच वर्षाच्या सत्तेत केले काय?-  शरद पवार

राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात असलेल्या सत्तेत काय केले? असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना विचारला.
Sharad Pawar - Uddhav Thakre
Sharad Pawar - Uddhav Thakre

जळगाव : राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी गेल्या पाच वर्षात असलेल्या सत्तेत काय केले? असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना विचारला.

जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, "उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली आहे. परंतु गेल्या पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी काय केले? त्यावेळी का नाही केला केला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? पाच वर्षाच्या सत्ताकाळात केलेल्या कामाची माहिती देवून त्यात अधिकचे काय करायचे हे सांगितले तरच लोक त्याकडे लक्ष देतात, अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला नसलेला भाव,राज्यातील विकास याप्रश्‍नाकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झालेआहे.'' गेल्या पाच वर्षात या सरकारने कोणातीही विकासाची कामे केलेली नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com