मोदी, फडणवीस सरकारकडून जनतेची फसवणूक - शरद पवार

देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र शेवटी जनतेची फसवणूक केली, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावतीत सांगितले.
मोदी, फडणवीस सरकारकडून जनतेची फसवणूक - शरद पवार

पुणे - देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र शेवटी जनतेची फसवणूक केली. त्यामुळे संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यासारख्या उमेदवारांना निवडून आणणे प्रचंड गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावतीत सांगितले.

संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीच्या अमरावती मतदारसंघातील अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, की या सरकारने धनगरांना फसवले, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात उभे राहिले. राज्यात आघाडी सरकार असताना मुस्लीम समाजाला दिले गेलेले आरक्षण हे सरकार येताच काढून घेतले गेले. त्यामुळे हे सरकार उलथवून देशात व राज्यात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com