सरकारकडे नक्षलग्रस्त भागासाठी विकास आराखडा नाही - शरद पवार

सरकारकडे नक्षलग्रस्त भागासाठी विकास आराखडा नाही - शरद पवार

मुंबई : नक्षलवादी हल्ल्यात राज्याचे सतरा जवान मृत्यूमुखी पडले असल्याने ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामागे सरकारची नक्षलग्रस्त भागातल्या विकासाबाबतची अनास्था कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना सांगली जिल्ह्यातील आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर या नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आमच्या सरकारने स्वतंत्रपणे विकास आराखडा तयार केला. त्यासाठी आर्थिक तरतूद देखील केली. स्वत: आर.आर.पाटील हे दर महिन्याला गडचिरोलीला जावून आढावा घेत असत. त्यामुळे, तिथल्या जनतेला सरकारबाबत विश्‍वास वाढला होता. अशी आठवण पवार यांनी सांगितली. 

मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. ते विदर्भातून येत असल्याने त्यांचे गडचिरोलीच्या विकासाकडे अधिक लक्ष राहील असे मानले जात होते. पण, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या नक्षलग्रस्त भागाच्या विकासाचा कोणताही आराखडाच नाही. त्यातून तिथल्या जनतेमधे नाराजी आहे. जेव्हा नक्षलग्रस्त भागातल्या जनतेत नाराजी असते तेंव्हा नक्षलवादी त्याचा फायदा घेतात. असे स्पष्ट करत सध्याचा झालेला हल्ला हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निष्काळजीपणाचा व अनास्थेचा परिणाम असल्याची टीका पवार यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com