जिनिव्हा करारामुळे अभिनंदन सुटले, भाजपने श्रेय घेऊ नये : शरद पवार

युद्ध सदृश्य परिस्थितीत सापडल्याने जिनिव्हा कराराचा फायदा झाला आणि त्यातून पायलट अभिनंदन यांची सुटका झाली. त्यानंतर अभिनंदन यांच्या पत्नीला भाजपला श्रेय घेऊ नये, असे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे भाजप सरकारच्या भूमिकेविषयी लोकांत नाराजी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
जिनिव्हा करारामुळे अभिनंदन सुटले, भाजपने श्रेय घेऊ नये : शरद पवार

नाशिक : युद्ध सदृश्य परिस्थितीत सापडल्याने जिनिव्हा कराराचा फायदा झाला आणि त्यातून पायलट अभिनंदन यांची सुटका झाली. त्यानंतर अभिनंदन यांच्या पत्नीला भाजपला श्रेय घेऊ नये, असे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे भाजप सरकारच्या भूमिकेविषयी लोकांत नाराजी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

चांदवड येथे झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. श्री पवार म्हणाले की, नुकताच देशातील सैनिकांवर काश्मीर खोऱ्यातील दहशवादी चळवळीत सहभागी झालेल्या युवकांनी हा हल्ला केला.त्यानंतर लष्कराला कारवाई करण्याचा अधिकार दिला असे सरकारने सांगितले. यामध्ये हवाई दलाने कारवाई करून ती आतंकवाद्यांचे स्थळे उद्धवस्त केली. यामधून आम्ही भारतीय कुणाच्या वाटेला जात नाही जर आमच्या वाट्याला कोणी गेले तर आम्ही त्यांना सोडणार नाही, हा संदेश दिला गेला. देशाच्या एक्क्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद राजकारण बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज असते.त्यादृष्टीने एकत्र येऊन सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जवानांनी शौर्य दाखविले हा चर्चेचा विषय नसून आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांच्या काळात सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नुकत्याच झालेल्या तीन राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. ज्या राज्यात भाजपची सत्ता होती त्याच सरकारला सत्ता गमवावी लागली याचा अर्थ वातावरण भाजपच्या विरोधात असून आगामी निवडणुकीत नक्की बदल होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सद्या युध्द सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, युद्ध सदृश्य परिस्थितीत सापडले गेल्याने जिनिव्हा कराराचा फायदा झाला आणि त्यातून अभिनंदन यांची सुटका झाली. त्यानंतर अभिनंदन यांच्या पत्नीला भाजपला श्रेय घेऊ नये असे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात राफेल ५६० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय झाला होता आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएलला देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजपने राफेल विमान साडे पंधराशे कोटी रुपयांना खरेदी केली जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएल न देता अंबानीच्या कंपनीला दिले जात आहे. एकीकडे पंतप्रधान न खाऊगा न खाणे दुगा अशी भाषा करतात त्यामुळे पंतप्रधानांचे यात गौडबंगाल आहे.

यावेळी  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ, दिपीका चव्हाण, नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, डाॅ. भारती पवार, अमृता पवार, माजी आमदार धनराज महाले, जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, दिलीप बनकर आदी नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com