नाशिक : स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास करणारे, परिक्षा देणारे या सगळ्या युवकांमध्ये 'महापोर्टल' विषयी अतिशय मोठी नाराजी होती. त्यासाठी युवक कॉंग्रेसने 'वेकअप महाराष्ट्र' मोहिम उघडली होती. आता हे शंकास्पद महापोर्टल बंद झाले. हे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या युवकांचे यश आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी केले.
ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीआधी युवक कॉंग्रेसने युवकांच्या प्रश्नांवर आंदोलन केले होते. त्यासाठी "वेकअप महाराष्ट्र' हे अभियान राबविले होते. त्यावेळी राज्यातील अनेक युवकांनी व स्प्रधा परिक्षा देणाऱ्या तरुणांनी या पोर्टल विषयी प्रश्न निर्माण केले होते. त्यांना या पोर्टलवर विश्वास नव्हता. त्यामुळे ते बंद करण्याची त्यांची मागणी होती. युवक कॉंग्रेसने देखील ही मागणी लाऊन धरली होती. राज्यात नवे सरकार आल्यावर हे पोर्टल बंद करण्यात आले आहे. त्यातून युवक. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण समाधानी आहेत. हे या तरुणांचे, युवक कॉंग्रेसच्या अभियानाचे यश आहे. त्यासाठी राज्य सरकारविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.''
राज्य शासन विविध विभागांतील रिक्त जागा भरणार आहेत. त्यानुसार बहात्तर हजार पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती संबंधीत विभाग आपल्या अखत्यारीत करील. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिक प्रभावीपणे काम करील. त्यावर युवकांचा विश्वास आहे. एक विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.