स्वाभिमान यात्रा स्थगित करून सत्तारांकडून पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

स्वाभिमान यात्रा स्थगित करून सत्तारांकडून पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराने घातलेले थैमान, यात चाळीसहून अधिक नागरिकांचे गेलेले बळी या पार्श्‍वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी आपली नियोजित स्वाभिमान यात्रा स्थगित केली आहे. या ऐवजी आता सत्तार मित्रमंडळाच्या वतीने मतदारसंघात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान मदतफेरी काढण्यात येणार आहे. तातडीची मदत म्हणून 11 लाखांची आर्थिक मदत, अन्नधान्य, डॉक्‍टरांचे पथक, औषधे, रुग्णवाहिका आणि जीवनावश्‍यक वस्तू घेवून सत्तार व त्यांचे मित्रमंडळ कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदतीचा हात देणार आहेत. 

आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळ, सिल्लोड नगर परिषद, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने तसेच मदत फेरीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना 11 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक निधी देण्यात येणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. सोबत 10 रुग्णवाहिका, डॉक्‍टरांचे पथक, औषधे, दोनशे क्विंटल अन्नधान्य, ब्लॅंकेट, जीवनावश्‍यक वस्तू घेवून लवकरच अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते पुरग्रस्त भागात जाणार आहेत. विशेष म्हणजे आठ ते दहा दिवस याच भागात थांबून ते पुरग्रस्तांना मदत करणार आहेत. 

15 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सिल्लोड शहरात पुरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात येणार असून शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी या मदत फेरीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सत्तार यांच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात स्वातंत्र्य दिनापासून काढण्यात येणारी स्वाभिमान यात्रा स्थगित करण्यात आल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com