सातारा : महामार्ग मुख्य रस्ता व सेवा रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी 15 दिवसांची मुदत देऊनही महामार्ग प्राधिकरणाने या कडे दूर्लक्ष केल्याने साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी (ता. 18) आनेवाडी टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेता आहे.
पावसाळ्यानंतर महामार्गाचा मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली होती. महामार्गावर सुविधा मिळत नसतील तर टोल कशासाठी भरायचा यावरून सातारकर नागरीकांनी टोल विरोधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सहभाग घेतला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण, पोलिस विभाग आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांची 16 नोव्हेंबरला साताऱ्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत महामार्गाच्या मुख्य रस्त्याची आणि सेवा रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे टोलनाका बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
मात्र, 15 दिवसांपेक्षा अधिक काळ होऊनही महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने सातारकर नागरीक संतप्त झाले. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येत्या बुधवारी (ता. 18) सातारा शहराशेजारील आनेवाडी टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिले आहे. त्यामुळे आनेवाडी टोलनाक्याचे आंदोलन दोन दिवसात पेटण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.