शिवसेना मनापासून आमच्या सोबत होतीच कधी : साताऱ्यातील भाजपच्या नेत्यांचा सवाल

शिवसेना मनापासून आमच्या सोबत होतीच कधी : साताऱ्यातील भाजपच्या नेत्यांचा सवाल

शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याकडे सातारा मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पूर्णपणे दूर्लक्ष केले आहे. शिवसेना मनापासून आमच्या सोबत होती कधी?, असा प्रश्‍न करून आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सातारा लोकसभा आणि विधानसभेच्या आठही मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्यातरी माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, साताऱ्यात त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत.

सातारा : शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याकडे सातारा मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पूर्णपणे दूर्लक्ष केले आहे. शिवसेना मनापासून आमच्या सोबत होती कधी?, असा प्रश्‍न करून आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सातारा लोकसभा आणि विधानसभेच्या आठही मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्यातरी माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, साताऱ्यात त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या पाच जणांवर पक्ष बांधणी आणि विस्ताराची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे शिवसेनेला निवडणुका जवळ येईलपर्यंत साधारण वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी यासाठी मिळणार आहे. पण आजपर्यंत शिवसेनेने साथ दिलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र, शिवसेनेच्या या भुमिकेकडे दुर्लक्षच केले आहे.

त्यांच्या मते शिवसेनेची जिल्ह्यात ताकद किती आणि आजवर शिवसेनेच्या नेत्यांनी मनापासून कधीच मदत केलेली नाही. उलट आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांतही यश मिळविले आहे. त्यामुळे या यशाच्या जोरावर भाजपचे नेते आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी करणार आहेत. सध्या सातारा जिल्ह्यात माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, सातारा येथे भाजपची मजबूत बांधणी असून तेथे उमेदवारही सक्षम आणि तगडा आहे. तर मागील वेळी कोरेगाव, फलटण, वाई हे मतदारसंघ शेतकरी संघटनेसाठी सोडले होते. त्यामुळे यावेळेस शेतकरी संघटना त्यांच्यासोबत राहणार का, हा ही प्रश्‍न आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघातही भाजपला लक्ष द्यावे लागणार आहे.

उर्वरित पाटण मतदारसंघात सध्या शिवसेनचे शंभूराज देसाई हे आमदार आहेत. तेथे भाजप फारसे लक्ष घालण्याची शक्‍यता कमी आहे. सध्यातरी मागील निवडणुकीतील यशावर भाजपने आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीची बांधणी करण्याची भुमिका घेतली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते किती यशस्वी होणार, याचीच उत्सुकता आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे वर्चस्व नाही. तर भाजपने मागील तीन चार निवडणुकीत चांगले यश मिळविले आहे. या यशाच्या जोरावर आम्ही आगामी विधानसभा व लोकसभेची बांधणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची मदत असली काय नसली काय काहीही फरक पडत नाही.
-अॅड. भारत पाटील (माजी जिल्हाध्यक्ष, भाजप)

भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने कधीही मनापासून मदत केलेली नाही. तसेच यापूर्वीच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याने सातारा जिल्ह्यात भाजपला काहीही फरक पडणार नाही. उलट आम्ही सर्व ठिकाणी सक्षम उमेदवार देऊ.
-डॉ. दिलीप येळगांवकर (माजी आमदार भाजप)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com