..तर शिवसेना सरकार बनवेल, आमच्याकडे पाठिंब्याची पत्र आहेत : संजय राऊत

आम्हालासरकार स्थापन करण्यासाठी जे मदत करायला तयार आहेत त्यांनी आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिलेले आहे.भाजपला सरकार बनवता आले नाही तर आम्ही ते पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना भेटून प्रत्यक्ष देऊन आणि सरकार स्थापन करू.-संजय राऊत
Raut sanjay
Raut sanjay

मुंबई  :  भारतीय जनता पक्षाला  सरकार बनवणे जमले नाही तर शिवसेना सरकार बनवेल,  असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंडिया टुडे  टीव्हीशी बोलताना केला आहे. 

संजय राऊत यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्या पाठीशी असून पाठिंब्याचे लेखी पत्र आपल्याकडे आहे असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे . 

श्री संजय राऊत असे म्हणाले, भाजपला सरकार स्थापन करणे जमले नाही तर शिवसेना 145 आकडा गाठून दाखवेल  .  शिवसेना सरकार बनवू शकते . आमची सरकार बनवण्याची संपूर्ण तयारी आहे.   आम्हाला  सरकार स्थापन करण्यासाठी जे मदत करायला तयार आहेत त्यांनी आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिलेले आहे.  भाजपला सरकार बनवता आले नाही तर आम्ही ते पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना भेटून प्रत्यक्ष देऊन आणि सरकार स्थापन करू. 


शिवसेना सत्ता स्थापनेपासून फक्त एक पाऊल दूर आहे मी हवेत बोलत नाही शिवसेनेकडे बहुमत आहेआमच्याकडे पाठिंब्याची कागदपत्रे तयार आहेत आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे , असा दावा श्री संजय राऊत यांनी  मुलाखतीत  केला आहे. 


श्री संजय राऊत पुढे म्हणाले की भाजप  हा सर्वात मोठा पक्ष आहे.  त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते बरोबर घेतले तरी त्यांचे 105 आमदार निवडून आलेले आहेत .  भाजपकडे भाजपाकडे ई डी चेही  सामर्थ्य आहे . त्यामुळे सरकार स्थापनेची संधी प्रथमच यांना मिळायला हवी. 

एका प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक झाली होती.  या बैठकीत अमित शहा - देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सत्तापदांचे समसमान फिफ्टी-फिफ्टी वाटप करायचे ठरले होते.  मात्र आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपने आपली भूमिका बदललेली आहे . ते  चर्चा करायची म्हणतात परंतु आधी ठरलेल्या 50 50 टक्केच्या फॉर्म्युलावर  चर्चा करायला तयार नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा कशी करायची? 

महाराष्ट्र मध्ये भाजपचे 105 आमदार निवडून आलेले  आहेत  आणि  15 अपक्ष आमदारांनी भाजपला  पाठिंबा दिलेला आहे . शिवसेनेचे 56 आमदार निवडून आलेले आहे आणि सात अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com