मुंबई: महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे एकत्र आले. शरद पवार आधीपासून म्हणत होते की आपल्याला हे जमवायचेय . आपल्याला हे करायचेय आणि तसे त्यांनी करून दाखवले, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
श्री संजय राऊत म्हणाले , निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे मी शरद पवार यांना भेटलो तेव्हा शरद पवार म्हणाले की आपल्याला हे जमवायचेय ,आपल्याला हे करायचे आहे आणि तसे त्यांनी करून दाखवलं. शरद पवार यांनासुद्धा काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी घडवून आणण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागल्या. मी जवळून पाहिलेले आहे . त्यामुळे हे सरकार आकाराला येऊ शकले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने आपल्या जीवनात जी पोकळी निर्माण झाली होती ती शरद पवार यांनी भरून काढली काय ? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, असू शकेल !
बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता असे विचारले असता श्री. संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर हा निर्णय त्यांनी आधीच घेतला असता . काँग्रेस पक्षाने सुद्धा केली नाही अशी जहरी टीका भाजपने शिवसेनेवर केली . मित्र पक्ष असूनही शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला . त्यामुळे साहेब आज असते तर फार पूर्वीच हा निर्णय झाला असता .
बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या विरोधात होते परंतु ते काँग्रेसच्या द्वेष करत नव्हते . बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते . बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिलेला होता . आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता . काँग्रेसनेही शिवसेनेला मदत केली आहे , असेही खा. राऊत म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.