सरकार व्यवस्थित चालू असताना भाजपला घोडेबाजार करण्याची गरज का वाटते ? - संजय राऊत 

ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आल्याने संतप्त राजकिय प्रतिक्रीया यायला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांवरचा गोळीबार हा सरकारने स्वतःच्या छातीवर मारलेली गोळी आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
सरकार व्यवस्थित चालू असताना भाजपला घोडेबाजार करण्याची गरज का वाटते ? - संजय राऊत 

मुंबई : ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आल्याने संतप्त राजकिय प्रतिक्रीया यायला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांवरचा गोळीबार हा सरकारने स्वतःच्या छातीवर मारलेली गोळी आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "मावळमध्ये जेव्हा शेतकऱ्यांवर आघाडी सरकारने गोळीबार केला तेव्हा त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजप सर्वच रस्तावर उतरले होते. ते निर्दयी सरकार आहे, असं त्यावेळी आम्ही म्हणालो होतो. आता जर तोच प्रकार शेवगावला शेतकऱ्याच्या मागण्यांच्या संदर्भात घडला असेल. 'मला वाटतं शेतकऱ्यांचं जे रक्तं आहे सांडलेलं आणि त्यांच्या आक्रोश आहे. तो आक्रोश सरकारला जाळून टाकल्याशिवाय रहाणार नाही.

संजय राऊत पुढे म्हणाले, "अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्ती पैसे जमा झालेले नाहीत. तिथे फसवणूक सुरू आहे. त्यासाठी सरकारकडे पैसा नाहीत. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. पण भाजपच्या तिजोरीत मात्र पैसे आहेत. ते सरकार चालवण्यापेक्षा इतर पक्षांचे आमदार आणि खासदार फोडण्यासाठी कसब पणला लावतात. त्यामुळे महाराष्ट्र २० वर्षे मागे जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

हर्षवर्धन जाधव यांना भाजप येण्यासाठी पाच कोटी रूपयांची ऑफर दिल्याच्या गोप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले, "जे सत्य सांगितले आहे. मुळात त्यांना सरकार व्यवस्थित चालू असताना घोडेबाजार करण्याची गरज का वाटते ? ज्या संबंधित मंत्र्यांवर आरोप केलेत. त्यांची सरकार चौकशी करेल तेव्हा करेल. पण शिवसेनेच्या संदर्भात आणि इतर पक्षांच्या संदर्भात भाजपचे जे खासदार आणि इतर नेते ईडीकडे किंवा इतर तपास यंत्रणेला पत्र लिहीत असतात. त्यांच्यासाठी हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकात पाटील ही एक फिट केस आहे. त्यांनी आधी या संदर्भात तपास पुर्ण करावा. ईडीला पत्र लिहावे. सीबीआयला पत्र लिहावे, असे सांगत संजय राऊत यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांची निष्पक्षपाती चौकशी करणार असाल तरच तुम्हाला इतरांवर बोट दाखवण्याचा अधिकार असल्याचे ठणकावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com