देश वाचवण्यासाठी निर्भीडपणे व्यक्त व्हा : संजय राऊत

राज्यात आणि देशात काही वर्षांपासून अस्वस्थता आहे. देशाचे सर्वेसर्वा असलेल्यांनी माध्यमे हातात घेतली आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. मराठी वृत्तपत्रांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. नैराश्‍यात असलेल्या महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मराठी वृत्तपत्रांत काय छापून आले आहे याबाबत देशात उत्सुकता असते, असे ते म्हणाले. वाचकांच्या पत्रांचे सदर आणि अग्रलेख बंद होतील, त्यावेळी वृत्तपत्रे रसातळाला जातील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देश वाचवण्यासाठी निर्भीडपणे व्यक्त व्हा : संजय राऊत

मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

पत्रकार दिनाचे औचित्य साधून खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी "सकाळ'चे वार्ताहर तेजस वाघमारे यांना शिवनेरकार विश्‍वनाथ वाबळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या समारंभाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, विश्‍वस्त प्रकाश कुळकर्णी, वैजयंती कुळकर्णी-आपटे, अजेय वैद्य, आमदार सुनील प्रभू, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते. 

राज्यात आणि देशात काही वर्षांपासून अस्वस्थता आहे. देशाचे सर्वेसर्वा असलेल्यांनी माध्यमे हातात घेतली आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. मराठी वृत्तपत्रांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. नैराश्‍यात असलेल्या महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मराठी वृत्तपत्रांत काय छापून आले आहे याबाबत देशात उत्सुकता असते, असे ते म्हणाले. वाचकांच्या पत्रांचे सदर आणि अग्रलेख बंद होतील, त्यावेळी वृत्तपत्रे रसातळाला जातील, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

या समारंभात शिवनेरकार विश्‍वनाथ वाबळे पुरस्काराने "सकाळ'चे वार्ताहर तेजस वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा वाहिनीच्या मनश्री पाठक यांना, तर जयहिंद प्रकाशन पुरस्कार सदानंद खोपकर आणि गुणाजी कार्जिडेकर यांना प्रदान करण्यात आला. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार जयू भाटकर यांना, विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार संजीवनी खेर यांना आणि रमेश भोगटे पुरस्कार एबीपी माझा वाहिनीचे वैभव परब यांना देण्यात आला. 
शिवसेना हिंदुत्वावर ठाम 
हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे, असे राऊत म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाण्याची तारीख निश्‍चित करतील, अशी माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य महान आहे. असे असताना केंद्र सरकार त्यांना भारतरत्न का देत नाही, असा सवाल त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com