अमित शहा जागावाटपाचे बोलले तरच ते खरे : संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut

नाशिक  : ''आजच्या युतीच्या जागावाटपाच्या बैठकीतील ११० आणि १६० हा बाहेर आलेला फॉर्म्युला चुकीचा आहे. हा फॉर्म्युला ना अमित शाह ना उद्धव ठाकरे कोणीच जाहीर केलेला नाही, आणि जे आधी ठरलंय त्याच प्रमाणे जागा वाटप केले जाईल. त्यामुळे मधे कोणी नाही. अमित शहा बोलले, उध्दव ठाकरे बोलले तरच खरे," बाकी काहीच नाही असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे सांगितले.

आज मुंबईत शिवसेना, भाजप जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक झाली. याबाबत आलेल्या बातम्यांविषयी ते बोलत होते. रोहित पवार यांच्या राजकीय सक्रीयतेविषयी ते म्हणाले, ''राजकारणात नवीन पिढी येत असते , ते कुठल्या पक्षाचे आहे ह्या पेक्षा ते काय काम करतात ते महत्वाचे आहे. मला वाटते तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवीन कार्यकर्ते घडवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे. नवीन पिढी जर राजकारणात येत आहे तर त्यांना उत्तेजना दिलीच पाहिजे. बाळासाहेब ठाकरे पण त्याच मताचे होते. कोणी विरोधी पक्षात असेल आणि चांगले काम करत असेल तर सत्ताधाऱ्यांनी पण त्यांना मदत केली पाहिजे." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com