शिवतारेंनी आधी गुंजवणीचे पाणी आणावे; नंतर मते मागावी : संजय जगताप

शिवतारेंनी आधी गुंजवणीचे पाणी आणावे; नंतर मते मागावी : संजय जगताप

गराडे : जलसंपदामंत्र्यांनी पुरंदर तालुक्‍यात 200 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे जाहीर केले. म्हणजे, जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाला, हे उघड आहे. एका सहीवर "गुंजवणी'चे पाणी आले, असे म्हणत दहा वर्षांत पाणी आले नाही. त्यांनी गुंजवणीचे पाणी आणल्यावरच मत मागावे, असे आवाहन कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी शिवतारे यांना केले.

हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, गराडे आदी भागांत प्रचारासाठी गावभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

जगताप म्हणाले, ""2014 मध्ये जनतेने त्यांना संधी दिली, राज्यमंत्रिपद मिळाले. 30 एप्रिल 2015 रोजी गुंजवणी धरणाच्या पाइपलाइनचे भूमिपूजन करणार, अशा वल्गना केल्या व त्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकल्या. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुंजवणी धरणाच्या पाइपलाइनच्या कामाचा भूमिपूजन समारंभ करणार, असे जाहीर केले. 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी या प्रकल्पासंदर्भात न्यायालयात केस सुरू असल्याचे सांगितले नाही. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, की त्यांना अचानक साक्षात्कार झाला संजय जगताप यांनी हा प्रकल्प अडविला. हा प्रकल्प पूर्ण करण्यात विजय शिवतारे यांना अपयश आले आहे.''

या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजीराव झेंडे, सुदाम इंगळे, दत्ता झुरंगे, गौरी कुंजीर, प्रदीप पोमण, डॉ. दिगंबर दुर्गाडे, बापूसाहेब कटके, योगेश फरतडे, एम. के. गायकवाड, ईश्वर बागमार, तानाजी घारे, बबनराव घाटे, प्रकाश फडतरे, गणेशकाका जगताप, माऊली घारे उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com