जयंत पाटलांनी रोझावाडीच्या तात्यांचे मानले आभार; म्हणाले, हेही संकट परतवून लावू!

वाळवा तालुक्यातील रोझावाडी गावचे शेतकरी बबनराव गुरुलिंग वाणी सोकाशी यांनी स्वतः च्या कष्टाने पिकवलेला १२ क्विंटल गहू गोरगरीब मजूरांमध्ये वाटून टाकला.
jayant patil
jayant patil

पुणे: "तात्या, अनेक संकटे आपण परतवून लावली आहेत. हेही संकट परतवून लावू," असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील रोझावाडी येथील शेतकरी बबनराव तात्या यांना म्हटले आहे.

तात्यांनी आपल्या शेतातील गहू गावातील गोरगरीब मजूर लोकांना मोफत वाटल्याने मंत्री पाटील यांनी तात्यांचे आभार मानले आहे.

कोरोनाच्या संकटकाळात मदतीचे शेकडो हात पुढे येत आहेत. समाजातील अनेक लोक आपल्या परीने मदत करत आहेत. संकटाची तीव्रता लोकांच्या लक्षात आल्याने लोकांनी जे शक्य होईल ती मदत करण्याच ठरवलं आहे. कोणी मास्क देत आहे. कोणी अनाथ लोकांना अन्न देत आहेत. सगळीकडून मदतीचे हात पुढे येत असतानाच क्रांतीवीरांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यातील रोझावाडी गावचे शेतकरी बबनराव गुरुलिंग वाणी सोकाशी यांनी स्वतः च्या कष्टाने पिकवलेला १२ क्विंटल गहू गोरगरीब मजूरांमध्ये वाटून टाकला. ही गोष्ट जेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी त्या शेतकऱ्याचे आभार मानले. "तात्या आपले आभार ! अनेक संकटे आपण एकजुटीने परतावून लावली आहेत, हे ही संकट आपण परतावून लावू." असे जयंत पाटील यांनी तात्यांना म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com