मंत्री भुमरे यांनी पहिल्याच बैठकीत घेतला ब्रम्हगव्हाण योजनेचा आढावा ...

मंत्री भुमरे यांनी पहिल्याच बैठकीत घेतला ब्रम्हगव्हाण योजनेचा आढावा ...

औरंगाबाद : राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या पहिल्याच आढावा बैठकीत पैठण मतदारसंघातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचा आढावा घेतला. ही योजना पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करतांनाच ही योजना कार्यन्वित झाल्यास तालुक्‍यातील 55 गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी देखील या योजनेच्या कामाला गती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. 

संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. मतदारसंघातील पिण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्यातील काम पुर्ण करून या भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन भुमरे यांनी विधानसभा निवडणुकीत दिले होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भुमरे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करत त्यांच्यावर रोजगार हमी व फलोत्पादन विभागाची महत्वाची जबाबदारी सोपवली. 

मंत्री झाल्यानंतर भुमरे यांनी आज औरंगाबाद येथील शासकीय विश्रामगृहात जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. आपल्या पहिल्याच बैठकीत भुमरेंनी मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या विषयाला हात घातला. भुमरे म्हणाले, योजनेचा दुसरा टप्पा पूर्णत्वास नेणे अत्यंत आवश्‍यक आहे. ही योजना पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. ही योजना पुर्ण झाल्यास अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचाच नाही तर सिंचनाचा देखील प्रश्‍न या योजनेमुळे सुटेल आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील योजनेच्या कामाला वेग देण्यासाठी प्रयत्न करावा. 

कंत्राटदारांकडून दंड वसुल करा... 
पैठणसह औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त व्हायला पाहिजे असे सांगतांनाच अपूर्ण विकासकामे, रस्ते, पूल, आपेगाव विकास प्राधिकरणाची कामे वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजे अशा सूचना देखील भुमरे यांनी यावेळी दिल्या. कंत्राटदारांनी दर्जेदार कामे करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतांनाच पैठण तालुक्‍यातील अपूर्ण विकासकामे नाथषष्टीपूर्वी पूर्ण करावीत, वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांकडून दंड वसुल करण्यात यावा असेही भुमरे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना बजावले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com