नवीन आमदारांना कामाची घाई !

sandip kshirsagar
sandip kshirsagar

बीड : दिग्गज काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करुन जायंट किलर ठरलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या शिरावर आता जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांनीही आमदार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी व गरिबांचा मुद्दा हातात घेऊन प्रशासला कामाला लावले आहे.


आमदार करताना संदीप क्षीरसागर यांच्याकडून तरुण, शेतकरी, व्यापारी, गरिब अशा विविध घटकांच्या अनेक अपेक्षा आहेत. सहाजिकच त्यांनाही त्याची जाण आहे. म्हणून गुरुवारी आमदार झालेल्या संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी लगेच शेतकऱ्यांचा प्रश्न हातात घेतला.

मागचे दिड वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाने नाकी नऊ आणले आहेत. मागचे आठ दिवस सलग पाऊस पडत असल्याने कपाशी, सोयाबीन, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी तहसिलदारांना दिल्या.

तर, दिवाळी तोंडावर असल्याने गरिबांना रेशन मिळाले पाहीजे. ग्रामीण भागात व शहरात एकही लाभार्थी रेशनपासून वंचित राहणार नाही असेही त्यांनी तहसिलदारांना सांगीतले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com