संभाजी भिडेंच्या अटकेसाठी एल्गार मार्च 

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी एल्गार मार्च 

मुंबई : मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, पण संभाजी भिडेंना अटक होत नाही. भिडे यांनाही त्वरीत अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी जनतेने येत्या 26 मार्च रोजी "एल्गार मार्च"जाहीर केला आहे. 

"भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान" व "सम्यक विद्यार्थी आंदोलन" या दोन्ही संघटनांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन पुकारले आहे. जिजामाता उद्यान ते विधानभवन या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. 

भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर आंबेडकरी जनतेने "महाराष्ट्र बंद" पुकारला होता. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी महिला, लहान मुले यांना मारहाण केली. पाच हजाराच्यावर तरूणांना तुरूंगात डांबले. त्यांच्यावर खून, विनयभंग, दंगल माजविल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यात नवपेशवाई सरकार अवतरले असून हे सरकार सामान्य जनतेचा आवाज चिरडून टाकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 

महाराष्ट्र बंदमधील आंदोलकांवरील सर्व खटले रद्द करावेत, भिमा - कोरेगाव हल्ल्याप्रकरणी नेमलेली समिती रद्द करून न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली नवी तपास समिती नेमण्यात यावी, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्याना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी टक्के उपस्थितीची अट रद्द करावी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांना पूर्ववत शिष्यवृत्ती सुरू करावी इत्यादी मागण्याही या आंदोलकांनी केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com