जमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांचे समाधी आंदोलन 

जमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांचे समाधी आंदोलन 

जयपूर : भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्‍न कोणतेच सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मागण्यांना तर वाटाण्याच्या अक्षताच लावलेल्या असतात. शेती हाच बहुसंख्य लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असताना त्याला उद्धवस्त करण्याचे उद्योग मात्र आपले मायबाप सरकार करीत असते. जयपूरमध्ये तर जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क समाधी आंदोलन सुरू केले आहे. 

जयपूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानासाठी राजस्थान सरकारने शेतकऱ्यांच्या जमीनी संपादन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या जमीनीवर आम्ही सुखाचे दोन घास खातो त्या जमीनी आम्ही प्राण गेला तरी देणार नाही असा निर्धार येथील शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जयपूरमधील शेतकऱ्यांनी गांधी जयंतीपासून समाधी आंदोलनास सुरवात केली आहे. 

या समाधीत शेतकरी बसून आहेत. एकवेळ या प्राण सोडू मात्र आमची शेती कदापी सरकारला देणार नाही असा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या अभिनव आंदोलनाचा राजस्थानातील भाजप सरकारने धसका घेतला आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने आवाहनही केले आहे. पण, शेतकरी आपली एक इंचही जमीन देण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या समाधी आंदोलनाने देशाचे लक्ष वेधले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com