फडणवीस शतकवीर तर शेट्टी भोपळावीर!

मी मातीतला पैलवान आहे. गादीवरच्या पैलवानाने माझ्या नादाला लागू नये. मी गेल्या ३२ वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करतोय.
फडणवीस शतकवीर तर शेट्टी भोपळावीर!

पुणे : राजू शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात पण फडणवीस यांनी दोन वेळा शतक केले आहे. 100 पेक्षा जास्त आमदार त्यांनी निवडून आणले आहेत. ते शतकवीर आहेत. शेट्टी भोपळावीर आहेत. भोपळावीराने शतकवीरावर टीका करणे शोभत नाही, या शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला आहे. 
 
काल राजू शेट्टी यांनी "युती सरकारला कडकनाथमुळे दणका बसला" असे म्हटले होते. त्यावर बोलताना खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली.

"पराभवामुळे राजू शेट्टी यांना नैराश्य आले आहे. कडकनाथमध्ये माझा अथवा माझ्या कुटुंबाचा कसलाही संबंध नाही. कडकनाथ घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा अशी मागणी मीच पहिल्यांदा केली होती. ज्या कंपनीचा माझा कसलाही संबंध नाही त्याचा वारंवार उल्लेख करून मला बदनाम करणारा गट कार्यरत आहे. राजू शेट्टी या गटाचे म्होरके आहेत. त्यांच्यासोबत आमच्या तालुक्यातील आमदारकीचे डोहाळे लागलेला एकजण आहे. आमदारकीचे डोहाळे लागलेल्या नेत्याला वाळवा तालुक्यातील प्रमुख विरोधक होता येत नाही. दोन भिन्न विचाराची लोक एकत्र येऊन मला बदनाम करत आहेत."असे खोत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com