बील न भरल्याने ग्रामविकास विभागाचे फोन कनेक्‍शन कट 

बील न भरल्याने ग्रामविकास विभागाचे फोन कनेक्‍शन कट 

मुंबई : "एमटीएनएल'चे बील न भरल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागातील बांधकाम भवन व मंत्रालयातील अनेक सचिवांसह अधिकाऱ्यांचे फोन कनेक्‍शन कट करण्यात आले आहे. 

ग्रामविकास विभागाचा कारभार बांधकाम भवन, 25 मर्झबान रोड फोर्ट, मुंबई येथून चालतो. या इमारतीतील फोनचे बील न भरल्याने एमटीएनएलने फोनचे कनेक्‍शन कट केले आहे. त्याबरोबर या विभागातील मंत्रालयीन आधिकाऱ्यांचेही फोन कनेक्‍शन कट केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. परिणाम मंत्रालयातील व बांधकाम भवन येथील कार्यालयातून इतर ठिकाणी संपर्क करण्यासाठी मोबाईलाचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत विचारणा केली असता एमटीएनएलचे कर्मचारी सी. राजू म्हणाले, " जर बील भरले गेले नाही तर सिस्टममध्ये सेटींग केलेल्या प्रोग्रामप्रमाणे फोन कापले जातात. शासनाच्या या विभागांनी बील भरले नसल्याने त्यांचे फोन आपोआप झाले आहेत." याबाबत बिल न भरल्याचे कारण समजून घेण्यासाठी ग्रामविकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com