विधानसभेला पिंपरीत त्रांगडे युतीच्या तिन्ही पक्षांचा क्लेम

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी शिवसेनेच्या वाट्याच्या व त्यांचा आमदार असलेल्या पिंपरी राखीव मतदारसंघावर आऱपीआयने दावा ठोकला आहे. तर भाजपकडूनही या मतदारसंघात जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे युती झाली, तर पिंपरीत उमेदवारीचे त्रांगडे निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ते दूर करण्यासाठी शिवसेना,भाजपकडून मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
BJP-Shivsena- RPI Logos
BJP-Shivsena- RPI Logos

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी शिवसेनेच्या वाट्याच्या व त्यांचा आमदार असलेल्या पिंपरी राखीव मतदारसंघावर आऱपीआयने दावा ठोकला आहे. तर भाजपकडूनही या मतदारसंघात जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे युती झाली, तर पिंपरीत उमेदवारीचे त्रांगडे निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ते दूर करण्यासाठी  शिवसेना,भाजपकडून मतदारसंघाची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युती झाली तर शहरात भाजपला एक जागा सोडावी लागण्याची शक्यता असल्याने ती होऊ नये, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांत भावना आहे. कारण युती झाली नाही,तर तिन्ही जागा जिंकू असा विश्वास त्यांना वाटतो आहे. त्यामुळे शहरात शत, प्रतिशत भाजपसाठी युती होऊ नये असे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही व त्यातही पिंपरी व भोसरीतील इच्छुकांना वाटत आहे. शहरात चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप, तर भोसरीत भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे आमदार आहेत.  त्यामुळे या दोन्ही जागी भाजपचा क्लेम राहणार आहे. 

तर, पिंपरीत शिवसेनेचे अॅड.गौतम चाबूकस्वार आमदार असल्याने तेथे त्यांचा दावा स्वाभाविक आहे. मात्र, आरपीआयने तेथे दावा ठोकल्याने शिवसेनेला ही जागा सोडावी लागेल. तसे झाले,तर त्याबदल्यात ते भोसरी मागतील,असा अंदाज आहे. म्हणून त्यांनी तेथे जोरदार तयारी सुरु केली आहे. भोसरीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी,तर भोसरीवर दावाही केला आहे. त्यानंतर मातोश्रीहून भोसरीतील राष्ट्रवादीचे दोन मातब्बर गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 

दुसरीकडे दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होणारच आहे.ती करण्याशिवाय त्यांना तरणोपायही नाही. परिणामी तिन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.कारण कॉंग्रेसची ताकद तिन्ही मतदारसंघात तोळामासा आहे. अशारितीने आघाडीचे जागावाटप पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास झाले असताना युतीत,मात्र घोळात घोळ आहे. तसेच युती झाली तरी शहरातील तिन्ही जागावाटपाचे त्रांगडे तिन्ही पक्षांत निर्माण होणार आहे. त्यावर प्रत्येक पक्षाला एकेक जागा देऊन हा तिढा मिटविला जाईल,असा राजकीय  जाणकारांचा होरा आहे.तसे झाले, तर आरपीआयला फायदा होऊन भाजपला फटका बसणार आहे. तर, शिवसेनेची स्थिती ना खुशी ना गम अशी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com