उदयनराजेंनी लोकशाहीचा निर्णय मान्य करायला हवा होता! 

काँग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी झाले असते तर आघाडीला त्याचा निश्चित फायदा झाला असता मात्र तो त्यांचा अंतर्गत निर्णय आहे.
उदयनराजेंनी लोकशाहीचा निर्णय मान्य करायला हवा होता! 

कराड : काँग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते प्रचारासाठी आले असते तर आघाडीच्या उमेदवारांना निश्चितच फायदा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी आमदार पवार आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले,  जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो,  त्यावेळी समाधी स्थळावर येऊन अभिवादन केले होते. विधानसभा निवडणुकीत लोकांनी दिलेल्या आशीर्वादानंतर राज्यातील प्रेरणास्थान असणाऱ्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात आहे. पहिल्याच विधानसभा निवडणुकीचा अनुभव चांगला असल्याचे सांगून ते म्हणाले, या निवडणुकीत जिंकण्यासाठी काय करायचे याबाबत अनेकांनी सांगितले होते, मात्र त्यातील चांगल्या गोष्टींचा आचरण करून निवडणूक जिंकली आहे. 

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, चार महिन्यापूर्वी निवडणुकीत त्यांना लोकांनी निवडून दिले होते. लोकशाहीचा निर्णय मान्य करायला हवा होता. मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. त्यामुळे या निवडणुकीत लोक श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले. राज्यात कॉंग्रेस आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आकडेवारीत जरी आघाडी मागे असली तरी लोकांचा विचार बदलत असल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com