कणकवली : कुठल्या कार्यक्रमात किती बोलायचं आणि काय नाही बोलायचं याच्यावरच मंत्री यशस्वी ठरतो. ही एक गोष्ट मी गेल्या पाच वर्षांत सांस्कृतिक मंत्री म्हणून शिकलो. मंत्री म्हणून यशस्वीही ठरलो, असे मला वाटते, असे प्रतिपादन माजी सांस्कृतिक कार्यवाह मंत्री विनोद तावडे यांनी येथे केले.
येथील आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि सिंधुभूमी अकादमी यांच्या संयुक्तपणे गदीमा, पुल आणि बाबुजींच्या आठवणींचा जागर असलेला "त्रिमूर्ती" हा कार्यक्रम झाला. याचे उद्घाटन विनोद तावडे यांनी केले.
यावेळी आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह राजन तेली, मधुसुदन नानिवडेकर, बिभीषण चौरे, नगराध्यक्ष समीर नलावडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री.तावडे यांनी पाच वर्षाच्या सांस्कृतिक मंत्रीपदाच्या कारकिर्दीत कुठल्या कार्यक्रमात किती बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे शिकलो. त्यामुळेच माझी मंत्रीपदाची कारकीर्द यशस्वी ठरल्याची भावना बोलून दाखवली.
तसंच जसं हा कार्यक्रम लवकर सुरू व्हावा असं रसिकांना वाटतं. तसंच सरकार देखील लवकर स्थापन व्हावं अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे असेही ते म्हणाले.
पुल, बाबूजी, गदिमा या त्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने केल्या वर्षभरात 100 कार्यशाळा घेतल्या. यात कवितेचं गाणं कसं तयार होतं. गीताला संगीत कसं दिलं जातं.
तसेच कथा कशी निर्माण होते आणि फुलते याबाबतचे मार्गदर्शन दिलं गेलं. यामुळे गदीमा, पुलं आणि बाबुजींचे विचार पुढच्या पिढीपर्यंतही जातील असाही विश्वास श्री.तावडे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात आमदार नीतेश राणे यांनीही मनोगत मांडले. तर प्रमोद जठार यांनी आभार मानले. "त्रिमूर्ती" कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.