रयत क्रांतीला हव्यात साताऱ्यात चार जागा 

कृषी व पणन राज्यमंत्री तथा साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातील चार जागा मिळाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामध्ये कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, माण आणि फलटणचा समावेश आहे. त्यामुळे भाजपचा मित्र पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला किती जागा सोडल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रयत क्रांतीला हव्यात साताऱ्यात चार जागा 

सातारा : कृषी व पणन राज्यमंत्री तथा साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातील चार जागा मिळाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामध्ये कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, माण आणि फलटणचा समावेश आहे. त्यामुळे भाजपचा मित्र पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला किती जागा सोडल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी आता विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप-सेना युतीचे जागा वाटप निश्‍चित झालेले नसले तरी सातारा जिल्ह्यातील पारंपारिक मतदारसंघावरून सेना व भाजपची जुंपणार आहे. अशातच भाजपच्या मित्र पक्षांना कोणते मतदारसंघ सोडले जाणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने माणची जागा मागितली आहे. आता सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनेही सातारा जिल्ह्यातून चार जागांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. त्यावेळी त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. त्यावेळी स्वाभिमानीने कोरेगाव, माण, कऱ्हाड उत्तर या तीन ठिकाणाहून निवडणुक लढविली होती. यामध्ये कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडेंना 43 हजार 903 मते मिळाली होती. तसेच कोरेगावातून संजय भगत यांना 13 हजार 126 मते तर फलटणमधून स्वाभिमानी पक्षातून पोपटराव काकडे यांना 24 हजार 529 मते मिळाली होती. त्यानंतर आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत आले. सदाभाऊ खोत भाजपसोबत जाऊन मंत्री झाले. त्यांच्याकडे साताऱ्याचे सहपालकमंत्री पदही आले. त्यामुळे त्यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना करून पश्‍चिम महाराष्ट्रात संघटनेचे जाळे तयार केले आहे. 

या वेळेस रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेला साताऱ्यातील चार मतदारसंघ देण्याची मागणी त्यांनी भाजपकडे केली आहे. याबाबचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. साताऱ्यात युतीच्या जागा वाटपात भाजप आपल्या मित्रपक्षांना कोणते मतदारसंघ सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रयत क्रांती संघटना कोरेगाव व कऱ्हाड उत्तरसाठी आग्रही आहे. त्यामुळे येथून रयत क्रांतीचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे. युतीच्या जागा वाटपात कोरेगाव शिवसेनेकडे असून यावेळेस कऱ्हाड उत्तरवरही त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटनेला कोणते मतदारसंघ भाजप सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com