मोदी- फडणवीस सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत : रविकांत तुपकर

''जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे सरकारविषयी शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक वाढत आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे की तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. आगामी निवडणुकांमध्ये मोदी, फडणविसांचे सरकार येऊ देणार नाही,'' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे दिला.
मोदी- फडणवीस सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत : रविकांत तुपकर

अकोला : ''जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे सरकारविषयी शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक वाढत आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे की तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. आगामी निवडणुकांमध्ये मोदी, फडणविसांचे सरकार येऊ देणार नाही,'' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे दिला.

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे रविवार (ता.सात) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थित 'स्वाभिमानीचे घर तिथे स्वाभिमानी' मोहिमेस सुरूवात करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बबनराव चेके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीष मोरे, वाशिम जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जितेंद्र खंडारे, शेख जुल्फेकार, विष्णु देशमुख, पुंडलीक शिंगणे, गजानन मुंढे, मधुकर शिंगणे, मधुकर वाघ, पंढरीनाथ म्हस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी भाजप सरकार व जिल्ह्यातील राजकारणाऱ्यांवर चौफेर टिकास्त्र सोडले.

शेतकऱ्यांचे भले करतील म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आम्ही कमळाबाई सोबत आम्ही दोन वर्षे संसार केला, असे सांगत 'विवाह एकाशी आणि घरोबा दुसऱ्याशी', अशा आशयाची टीका तुपकर यांनी केली. ते म्हणाले, "आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व शेतमालाला योग्य भाव या मुद्यावर यांना पाठिंबा दिला होता. मात्र, हे सरकार अंबानी, अदाणी, टाटासाठी 'अच्छे दिन' देणारे निघाले. कर्जमुक्तीच्या जाचक अटी, हमीभावासाठी अडवणुकीचे धोरण राबवून शेतकरी संपविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात गावा-गावात शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून आम्ही लढायला सज्ज झालो आहोत."

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या काही नेत्यांनी जिल्हा बॅंकेवर डल्ला मारल्याचे सांगत जिल्हा बॅंक खाणाऱ्यांच्या विरोधात लढाई सुरूच राहणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com