भोकरदन : पूर्वीच्या काळी जहां राजा वहां प्रजा!, अशी स्थिती होती . आता मात्र भारतात लोकशाही आहे. त्यामुळे जहा प्रजा वहा राजा! अशी स्थिती आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे.
सर्वप्रथम संभाजीराजे, त्यानंतर शिवेंद्रराजे आता उदयनराजे सारे राजे भारतीय जनता पक्षात आले असून त्यांनी योग्यवेळी प्रजेचा कल लक्षात घेतला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी सरकारनामाशी आज बोलताना दिली .
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी संवाद साधला. "राजाला प्रजेचा मान राखावा लागतो" असे देखील दानवे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षि शाहू महाराज यांचे वंशज असणारे हे सर्व राजे असून त्यांच्यामागे एक वलय आहे.त्यांना मानणारा महाराष्ट्राचा मोठा मतदार आहे.
राजांचा झालेला भाजपा प्रवेश हा भाजपला जातीवादी म्हणणारा पुरोगाम्यांच्या तोंडावर चपराक असून भाजप हा आता सर्वसमावेशक पक्ष झालेला आहे याउलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता खऱ्या अर्थाने ओहोटी लागली आहे, अशी श्री. दानवे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.