"काळ मांजर आडवं आलं तरी प्लास्टिक बंदी होणारच, रामदासभाईंचे राज ठाकरेंना जशासतसे उत्तर 

"काळ मांजर आडवं आलं तरी प्लास्टिक बंदी होणारच, रामदासभाईंचे राज ठाकरेंना जशासतसे उत्तर 

मुंबई : "काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच' असे सांगत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला जशासतसे उत्तर दिले. 

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाबाबत पत्रकारपरिषदेत बोलताना राज यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की एखाद्याला आलेला झटका हे राज्याचं धोरण होऊ शकत नाही. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जर रामदास कदमांनी घेतलेला असेल त्याची उत्तरेही त्यांनीच दिली पाहिजेत. त्यांनी आमच्या नात्यावर बोलू नये प्लॅस्टिक बाबत काय करायचे आणि काय करायचे नाही हे कदम यांनी ठरवावे. इतका महत्त्वाचा निर्णय जर घेतला असेल आणि त्याला विरोध होत असेल तर त्याची उत्तरे देण्याची जबाबदारी मंत्री म्हणून कदमांची आहे. मला कोणाशी काही देणं घेणं नाही. विनाकारण हा विषय दुसरीकडे घेऊन जायचे कारण नाही. आमच्या नात्यावर त्यांनी बोलू नये.'' 

राज यांना उत्तर देताना कदम म्हणाले, की निर्णय हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत होत असतात, ज्याचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांकडे असते. राज ठाकरे यांना फक्त निवडणुका आणि पैसाच दिसतो. काही होवो काळं मांजर आडवं आलं तरी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होणारच. ही बंदी कोणत्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com