उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य: आठवले

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची मतभिन्नता उघड झाली आहे. राज्य सरकारमधील निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमत करून घेतले गेले पाहिजेत.
ramdas athawale on elgar parishad investigation
ramdas athawale on elgar parishad investigation

मुंबई : एल्गार परिषदेचा तपास तपास एनआयएकडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरणातील एल्गार परिषदेचा तपास एनआयए करणार आहे. त्याबरोबर आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचाही तपास एनआयए ला देण्यात यावा, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

एखाद्या प्रकरणावरून राज्य सरकारमधील सत्तापक्षातील नेत्यांचे जाहीर वाद होणे योग्य नाही. असे यापुर्वीही कधीही झाले नाही. सरकारने अंतर्गत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत. जाहीररित्या वाद टाळले पाहिजेत असा सल्ला रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com