`शिवसेनेला भाजपने दीड वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावे`

रामदास आठवले यांचा असाही फाॅर्म्यूला....
`शिवसेनेला भाजपने दीड वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावे`

मुंबई : शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत परस्पर विरोधी विचारांची युती करून  अल्पकाळ टिकणारे सरकार स्थापन करण्यापेक्षा भाजपसोबत सरकार स्थापन करावे. त्यासाठी भाजपला साडेतीन वर्षे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेने साडेतीन वर्षे उपमुख्यमंत्री पद घ्यावे. त्यांनतरची दीड वर्षे शिवसेनेने मुख्यमंत्री पद घ्यावे आणि भाजपने दीड वर्षे उपमुख्यमंत्री पद घेऊन आपसातील वाद मिटवावा आणि महायुती चे सरकार स्थापन करून जनमताचा सन्मान राखावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांना केले आहे. 

 शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. शिवसेनेशी  काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ने युती केल्यास ती अनुचित युती ठरेल. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या आमदारांनी शिवसेनेशी अनेक वर्षे वैचारिक कडवट लढा  दिला. त्या आमदारांवर या अनुचित युती मुळे अन्याय होईल. त्यामुळे  काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. देशभरात काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून असलेला जनाधार शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे धोक्यात येऊ शकतो याचा विचार त्यांनी केला पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.

शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत ते महायुतीमुळे आलेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढून निवडून आलेत. हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून शिवसेनेला पसंती देणाऱ्या  त्यांच्या समर्थकांचाही आणि भाजप शिवसेना महायुती ला पसंती देणाऱ्या मतदारांचाही विश्वासघात शिवसेनेने  काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाऊन करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com