पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येकी 25 लाख - रामदास आठवले

पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येकी 25 लाख - रामदास आठवले

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार निधीतून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. श्री. आठवले पुढे म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या सरपंचांशी आज चर्चा केली. पुराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला नद्या जोड प्रकल्प गेल्या 60-65 वर्षात राबवला असता, तर अशी वेळ आली नसती. पूरग्रस्तांना सोयी मिळत असल्याची माहिती आज दौऱ्यादरम्यान मला पूरग्रस्तांकडून मिळाली. प्रशासनाच्या सोबत कोल्हापूरकर मदत कार्यात अग्रेसर आहेत त्यांना धन्यवाद ! पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com