पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्याने राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आऊटगोईंग : आठवले

राष्ट्रवादीतील नेतेमंडळी भाजप घेत आहेत, असा आरोप करण्यापेक्षा पवारसाहेब व राष्ट्रवादीने आपली लोकं सांभाळली पाहिजेत,असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिला.पवारसाहेबांना त्यांच्या नेत्यांनी सोडून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्याने राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आऊटगोईंग : आठवले

पिंपरी : राष्ट्रवादीतील नेतेमंडळी भाजप घेत आहेत, असा आरोप करण्यापेक्षा पवारसाहेब व राष्ट्रवादीने आपली लोकं सांभाळली पाहिजेत,असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिला.पवारसाहेबांना त्यांच्या नेत्यांनी सोडून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

पुन्हा निवडून येऊ तसेच आघाडीची सत्ता पुन्हा येईल,असे वाटत नसल्यानेच राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून शिवसेना, भाजपमध्ये जात आहेत, असे निरीक्षण आठवलेंनी नोंदवले. तेथे गेलो, तर आपली आमदारकी राहू शकते. तसेच सत्ताही पुन्हा मिळू शकते,असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. राष्ट्रवादीतील वाढत्या आऊटगोईंगवर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. शरद पवारांचे त्यांनी कौतूक केले. त्यांच्या राजवटीत त्यांनी दलित व मराठा समाज आणि शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले, अशी पावती आठवलेंनी दिली. त्यामुळे त्यांना त्यांच्या नेत्यांनी सोडून जाऊ नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com