मुंबई : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा बनाव आयएसआयला रचायचा होता. तशी ओळखपत्रेही या दहशतवाद्यांकडे सापडली होती. जिवंत सापडलेल्या अजमल कसाबला मारण्याची सुपारी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला देण्यात आली होती, असा दावा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आत्मचरित्रात केला आहे.
पोलिसांना कसाबचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे नव्हते. दहशतवाद्यांची माहिती प्रसारमाध्यमांना मिळू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जगभरात नाचक्की होऊ नये म्हणून आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाने कसाबला मारण्याची सुपारी दावूदला दिली होती, असा दावा मारिया यांनी या पुस्तकात केला आहे.
कसाबच्या विरोधात जनतेमध्ये आक्रोश होता आणि पोलिस दलातील काही अधिकारीही संतप्त झाले होते. त्यामुळे कसाबला जिवंत ठेवण्यास माझे प्राधान्य होते, असेही त्यांनी म्हटले आहे. 26/11 चा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा देखावा आयएसआयला निर्माण करायचा होता. त्यासाठी दहशतवाद्यांकडे हिंदू नावाची ओळखपत्रे देण्यात आली होती. त्यापैकी एका ओळखपत्रावर 'समीर चौधरी' असे नाव लिहिले होते, असा दावा मारिया यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.