योगी आदित्यनाथ प्रथम ; उद्धव ठाकरे 'या' क्रमांकावर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला.
4shiv_sna_adiyanath.jpg
4shiv_sna_adiyanath.jpg

मुंबई :  देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी सातवे स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. योगींनी सलग तिसऱ्यांदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. 

एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या; तर उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्‌सने (मूड ऑफ द नेशन सर्व्हे) केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
 
हा सर्व्हे यंदा १५ ते २७ जुलै या कालावधीत ९७ लोकसभा मतदारसंघात केला आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी तपासून ही क्रमावारी जाहीर करण्यात आली आहे.

बिगर भाजप मुख्यमंत्र्याना पसंती
विशेष म्हणजे यादीत भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत. दिल्लीची धुरा दुसऱ्यांदा सांभाळणारे अरविंद केजरीवाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मंत्री जगनमोहन रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत; तर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.


हेही वाचा : वाघांना वाचविण्यासाठी आदिवासी शेतकरी रस्त्यावर...
 
बुलढाणा : अकोला खंडवा रेल्वे मार्गाचं रुंदीकरण सध्या सुरु आहे, हा मार्ग रेल्वे मंत्रालयानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार आहे. पण हा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून न करता बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने न्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व या भागातील आदिवासी सरकारच लक्ष वेधण्यासाठी मोठ आंदोलन बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वारखेड़ गावाजवळ सुरु आहे.  अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून हा मार्ग पर्यायी मार्गाने करायची मागणी केली होती. कालच वाघाना वाचविण्यासाठी मुख्यमंत्रानी वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com