...,तर कोरोनाच्या नावाखाली केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावेल

राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवासापासून सुमारे 18 टक्क्याने वाढ झाली आहे.
Ncp Leader Nawab Malik

Ncp Leader Nawab Malik

Sarkarnama

पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यात आणि देशात कोरोनाच्या (Covid-19) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, राज्यातील रूग्णसंख्येत सुमारे १८ टक्क्यांनी वाढ झाल्याने राज्यात तिसरी लाट येऊ शकते, असा धोका निर्माण झाल्याची माहिती अल्पसंख्याक राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (ता.24 डिसेंबर) मिडिया स्टॅण्ड येथे दिली आहे. दरम्यान, तिसरी लाट येईल यामुळे भीतीने न्यायालयाने देशातील पाच राज्यात होणाऱ्या निवडणुका (Assembly Election) तीन महिने पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. मात्र, यामुळे केंद्र सरकार (Central Government) याचा फायदा घेत, या राज्यात राष्ट्रपती राजवट लावून सत्ता काबीज करेल, अशी शक्यता मलिकांनी व्यक्त केली आहे.

<div class="paragraphs"><p>Ncp Leader Nawab Malik </p></div>
भाजपची चमकोगिरी... १४ लाखांचा भुर्दंड मात्र नाशिक महापालिकेला!

बुधवारी (ता.22 डिसेंबर) झालेल्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये कोरोनाचा आढावा घेण्यात आला व कोरोनाची माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ओमीक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच जगात नव्याने डेलमायक्रोनचा वायरस आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (ता.24 डिसेंबर) टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात काही निर्बंध लावायचे असल्यास त्याबाबतही आज निर्णय होईल असे मलिकांनी सांगितले. तर, तिसरी लाट ही जानेवारी ते मे महिन्यापर्यंत येऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

मलिक म्हणाले, बंगाल, तामिळनाडूची निवडणूक झाल्यानंतर देशात दुसरी लाट आली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने तिसरी लाट येऊ शकते म्हणून दोन-तीन महिने निवडणुका पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. मात्र, निवडणूका पुढे ढकलण्याच्या नावाखाली देशात आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यातील निवडणुका आहेत. तिथे केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो आणि पंजाब व अन्य राज्यातील सत्ता ताब्यात घेणे त्यांनी शक्य होऊ शकते, अशी केंद्र सरकारच्या हेतूबद्दल मलिकांनी शंका व्यक्त करत टीका केली आहे.

<div class="paragraphs"><p>Ncp Leader Nawab Malik </p></div>
धोका वाढला; राज्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

दरम्यान, कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलणे हे वेगळे संकट देशात निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही निर्बंध घालून मर्यादित डोर टू डोर प्रचार करत व कोरोना नियम पालन करत निवडणुका होऊ शकतात, व त्या व्हाव्यात असा सल्ला देत निवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com