आता भाजप सरकारविरूद्ध 'आरपार'ची लढाई : रविकांत तुपकर

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून भाजप सरकार विरूद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाने काल अंतीम टोक गाठले. केंद्र व राज्यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडण्याचे व महाराष्ट्र वस्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र खासदार राजु शेट्टी व महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
आता भाजप सरकारविरूद्ध 'आरपार'ची लढाई : रविकांत तुपकर

अकोला : शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' येणार असल्याचे फसवे आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशाच केली आहे. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारमधून आम्ही बाहेर पडलो आहोत. आता शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर पुन्हा देश व राज्यात आंदोलनाची धार अधिक तीव्र करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी भाजप सरकारविरूद्ध 'आरपार' ची लढाई लढणार असल्याची सिंह गर्जना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेता रविकांत तुपकर यांनी 'सरकारनामा' शी बोलताना केली.

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून भाजप सरकार विरूद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाने काल अंतीम टोक गाठले. केंद्र व राज्यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडण्याचे व महाराष्ट्र वस्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र खासदार राजु शेट्टी व महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे त्यामुळे स्वाभिमानी आता अधिकृतरित्या एनडीए व राज्यसरकारचा भाग नाही. यापुढे स्वाभिमानी राज्यासह देशभर शेतकरी आंदोलन उभे करणार असून देशव्यापी संघर्ष यात्रेचा पुढील टप्पा 16 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. राज्यातही आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना कापुस, ऊस सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारविरोधात जोरकस लढाईसाठी सज्ज झाल्याचे स्वाभिमानी चे युवा नेता रविकांत तुपकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सत्तेत राहण्याची विनंती केली. मात्र गेल्या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांचे वाढलेले कर्ज, वाढलेल्या आत्महत्या, पिकांना न मिळणारा हमी भाव, शेतकऱ्यांच्या अनेक वाढत चाललेल्या अडचणी सोडविण्यास हे सरकार अपयशी ठरल्याने स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. यापुढे  शेतकऱ्यांच्या मनामध्ये लढण्याचा विश्वास निर्माण करुण व शेतकऱ्यांची चळवळ देशपातळीवर मजबूत करुण  स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात सदैव रस्त्यावर उतरणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com