एकनाथ शिंदे म्हणाले, "औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना सोडणार नाही.." 

बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गौरी हॉलमध्ये २५० बेडचे हे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे.
3Eknath_shinde_shivesenakopari_pachpakhdi.jpg
3Eknath_shinde_shivesenakopari_pachpakhdi.jpg

उल्हासनगर : बदलापूरमधील कोविड रुग्णालयाचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घघाटन करण्यात आले. बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गौरी हॉलमध्ये २५० बेडचे हे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे.  

यावेळी कोविड चाचणी लॅबचे उद्घघाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. याठिकाणी ३० बेडचे आयसीयू कक्ष उभारण्यात येत आहे. तर या हॉलमध्ये जे २५० बेड उभारण्यात आले आहे. ते सर्व ऑक्सिजन यंत्रणा असलेले आहेत. बदलापूर नगरपालिकेच्या वतीने याआधी बीएसयूपीच्या घरामध्ये कोविड केअर सेंटर उभारले होते. मात्र, ऑक्सिजनची यंत्रणा असलेले एकही रुग्णालय नसल्याने पालिकेने रुग्णालय उभारले आहे. 

सध्या ठाणे जिल्ह्यात रेमडिसीवीर आणि टोक्लिझोमॅप या औषधांचा काळाबाजार सुरु आहे. यासंदर्भात तक्रारीही वाढत आहेत. त्यामुळे या औषधांचा पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून संकटकाळात सर्वांनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे.

अशा काळात जो कोणी औषधांचा काळाबाजार करेल, त्याच्यावर सक्त कारवाई केली जाणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये ही औषधे कशी उपलब्ध करून देता येतील यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळी सांगितलं. जिल्हा प्रशानाच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे लोक काळाबाजार करीत असतील आरोग्य विभाग त्याकडे लक्ष देईल, असेही शिंदे यांनी नमूद केलं.  

 
सकाळी पॅाझिटिव्ह... सांयकाळी निगेटिव्ह...  
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभर  'चेस द व्हायरस' ही मोहीम सुरू आहे. पण काही ठिकाणी कोरोना तपासणी अहवालातच गैरप्रकार होत असल्याने रूग्ण मात्र हवालदिल झाले आहेत. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी असे प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका प्रशासनाने जनतेची काळजी घेण्याऐवजी त्यांचा कोरोना अहवाल चुकीचा देऊन नागरिकांना मनस्ताप होत आहे, याला जबाबदार असलेल्या संबधितांना मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे दिला आहे. सकाळी कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह येतो, संध्याकाळी अहवाल निगेटिव्ह असल्याचं सांगितलं जाते. 

दहिसरमध्ये 900 बेडचं सेंटर उभारलं आहे. ते भरण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अॅटीजन टेस्ट 30 ते 40 टक्के आहेत. उफळ पांढर करायचं आहे का ? आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहोत, मनसेचे म्हणणं आहे. सकाळी मुंबई महापालिकेचे कर्मचारी सांगतात तुम्ही पॅाझिटिव्ह आहात पण ते पेनाने निगेटिव्ह खोडून पॅाझिटिव्ह लिहिलं जातं, यावर विचारणा केली असता, संध्याकाळी निगेटिव्ह सांगितलं जातं, असं प्रकार नेहमीच घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.  
Edited  by : Mangesh Mahale   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com