मुख्यमंत्री म्हणाले, मी जे बोलतो ते करतो..

तुमच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो, आधीही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी धावून येत होतो, आताही येतोय. या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. केवळ तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणूुन काही आकडे घोषित करणार नाही, माझा तो स्वभाव नाही. जे बोलतो ते करतोच, जे होणार नाही ते बोलणारही नाही.
cm udhav thackeray news omanabad
cm udhav thackeray news omanabad

उस्मानाबाद ः मी तुमचे समाधान करायला आलो आहे, तुम्हाला ताकद द्यायला आलो आहे. केवळ तुम्हाला बरे वाटावे म्हणून आकडा घोषित करणार नाही. कारण मी जे बोलतो ते करतो, जे करू शकत नाही ते कधी बोलत नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ७० ते ८० टक्के पंचनामे पुर्ण झाले आहेत. तेव्हा येत्या दोन दिवसांत मंत्रीमंडळाची बैठक बोलावून मदत जाहीर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री आज उस्मनाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील नुकसानीची पाहणी ठाकरे यांनी केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा देतांना त्यांनी मी व माझे महाविकास आघाडी सरकार तुम्हाला पुन्हा पुर्ण ताकदीने उभे करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले.

राज्यात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकं, फळबागा आणि पावासाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतजमीनी खरडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. रब्बी हंगाम हातचा गेल्यानंतर आता खरीपाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, पण हातात पैसाच नसल्याने तो हतबल झाला आहे. मराठवाड्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे मंत्री पाहणीसाठी फिरत आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी सोलापूरनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुमच्यासाठी किंवा तुम्हा माझ्यासाठी नवीन नाही. तुमच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो, आधीही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी धावून येत होतो, आताही येतोय. या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. केवळ तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणूुन काही आकडे घोषित करणार नाही, माझा तो स्वभाव नाही. जे बोलतो ते करतोच, जे होणार नाही ते बोलणारही नाही.

या वर्षाची सुरूवातच कोरोना सारख्या जागतिक संकटाने झाली. त्याच्याशी लढत आपण सावरू लागलो तोच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने तडाखा दिला. अजूनही पुढचे पाच-सात दिवस आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट निश्चितच मोठे आहे.

सहाजिकच तुमच्या माझ्याकडून अपेक्षा असणार. पण फक्त लोकप्रिय घोषणा करणार नाही, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा आणि ताकद देणारा निर्णय येत्या दोन दिवसांत घेईन, असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.धीर सोडू नका, खचून जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com