भाजपचे पुन्हा आंदोलनास्त्र : पीककर्जासाठी 10 ऑगस्टला ठिय्या 

शेतकऱ्यांनाहक्काचे पीककर्ज मिळावे, यासाठी सोमवारपासून (ता. 10 ऑगस्ट) भाजप कार्यकर्ता प्रत्येक बॅंकेत जाऊन शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचा लाभ घेण्यासाठी सहायक म्हणून मदत करणार आहे. तसेच, कर्ज माफीनंतरचे व्याज बॅंकांनी हडपू नये, यासाठी ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.
BJP's agitation for crop loan on August 10
BJP's agitation for crop loan on August 10

मुंबई : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व राष्ट्रीयकृत बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात दिरंगाई करत आहेत. अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांना हक्काचे पीककर्ज मिळावे, यासाठी सोमवारपासून (ता. 10 ऑगस्ट) भाजप कार्यकर्ता प्रत्येक बॅंकेत जाऊन शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचा लाभ घेण्यासाठी सहायक म्हणून मदत करणार आहे. तसेच, कर्ज माफीनंतरचे व्याज बॅंकांनी हडपू नये, यासाठी ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती डॉ. बोंडे यांनी दिली आहे. 

राज्य सरकारने कर्जमाफी घोषित केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज मिळू शकलेले नाही. कर्जमाफी झालेले शेतकरी व जुने कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पीक कर्जाकरिता फक्त सातबारा, आठ अ व आधार कार्ड एवढ्याच गोष्टींची आवश्‍यकता आहे. मात्र, यंदा कर्जमाफी याद्याची तपासणी करूनसुद्धा बॅंका शेतकऱ्यांना व्याजाचे पैसे भरायला सांगणे, शेत नकाशा, फेरफार, ना हरकत प्रमाणपत्र अशा अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करत आहे. या सगळ्या कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकऱ्यांचा वेळ खर्ची जात आहे, असेही बोंडे यांनी या वेळी सांगितले. 

अमरावती विभागात अल्प कर्ज वाटप 

अमरावती विभागामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांकडून 2201 कोटी रुपयांचे कर्जवाटप अपेक्षित होते. मात्र, 1351 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. अमरावती जिल्हा सहकारी बॅंकेने फक्त 33 टक्के रकमेचे वाटप केले आहे. अमरावती विभागामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांनी 5 हजार 974 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी फक्त 1 हजार 834 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अमरावती विभागामध्ये फक्त 30 टक्के कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बॅंकेनी केले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त 23 टक्के कर्जवाटप राष्ट्रीयकृत बॅंकेनी केले आहे. 

हेही वाचा : रथयात्रेत खडसेंचा सहभाग; फडणवीसांचा पुरावा कुठाय? 

जळगाव : अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानिमित्त कारसेवा आणि लालकष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणींना उजाळाही मिळाला. पण, या रथयात्रेवरून जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुराव्यांचा राजकीय धुराळा उडाला आहे. त्यात आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी भूमिपूजना निमित्ताने जिल्ह्यात अनेकांनी आठवणी सांगितल्या, त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी आपण जळगाव जिल्ह्यात पाळधी येथे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे स्वागत केले. आपलाही या रथयात्रेत सहभाग असल्याचे सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com