पुणे : स्वराज्याच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील गड, किल्ल्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक गड-किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझडही झाली असून काहींची होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याच मुद्याकडे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य उभारणीसाठी मावळ्याइतकेच दुर्गम गड, किल्ल्यांचेही साहाय्य लाभले आहे. स्वराज्याचे वैभव असलेल्या या गड, किल्ल्यांची सध्या मात्र हेळसांड होत आहे. अनेक किल्ल्यांची पडझड झाली आहे. तोच मुद्दा खासदार अमोल कोल्हे यांनी उचलून धरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांत कोल्हे यांनी यावर काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते या गड, किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबत कायम पाठपुरावा करीत असतात. आताही त्यांनी काही किल्ल्यांच्या पडझडीचे फोटो ट्विट करून त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ज्यांच्यामुळे मंदिरात देव राहिला आहे, त्या माणसातून देवत्वाला पोचलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची मंदिरं अर्थात महाराष्ट्रातील गड, किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. शिवप्रेमींसाठी हेच मंदिर आणि हीच आस्था आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन पडझड झालेल्या गड किल्यांची तत्काळ दुरुस्ती करून संवर्धन करावे.'
डॉ. कोल्हे ट्विटमध्ये म्हणतात, "केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, राज्याचे पर्यटन मंत्री, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आपणास विनंती आहे की, महाराष्ट्राचा ठेवा असलेले गड-किल्ले यांची होणारी पडझड थांबवावी. त्यासाठी त्यांची तातडीने दुरुस्ती आणि संवर्धन करावे.'
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत गड, किल्ल्यांच्या पडझडीचा विषय उपस्थित केला होता. ज्या ज्या वेळी संधी मिळेल, त्या त्या वेळी त्यांनी गड किल्ल्यांचा विषय मांडून त्यांच्या डागडुजीची मागणी केलेली आहे. कोल्हे यांच्या या मागणीवर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकार काय निर्णय घेते, या कडे राज्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : रथयात्रेत खडसेंचा सहभाग; फडणवीसांचा पुरावा कुठाय?
जळगाव : अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्यानिमित्त कारसेवा आणि लालकष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणींना उजाळाही मिळाला. पण, या रथयात्रेवरून जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुराव्यांचा राजकीय धुराळा उडाला आहे. त्यात आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करीत आहेत.
अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी भूमिपूजना निमित्ताने जिल्ह्यात अनेकांनी आठवणी सांगितल्या, त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी आपण जळगाव जिल्ह्यात पाळधी येथे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे स्वागत केले. आपलाही या रथयात्रेत सहभाग असल्याचे सांगितले.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.